औरंगाबाद : मराठवाड्याचा छोटा समुद्र अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर यंदा काठोकाठ भरलं आहे. पण स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची यामुळे निराशा होणार आहे. परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचा काळ सुरु झाला आहे. धरण भरल्यामुळे या पक्ष्यांचं वास्तव्य असणाऱ्या जागेवरही यावेळी पाणी आहे. त्यामुळे फ्लेमिंगोसह इतर परदेशी पाहुणे यावेळी जायकवाडी धरणाकडे येणार का याबाबत अनिश्चितता आहे.
पर्यटकांचे यंदा 'नाथसागरा'कडे पाठ?