विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीला बहुमत र राज्यात सहज सरकार धरलेल्या भाजपमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद व सत्तेतील समान वाटा या मागण्यांसाठी अड्न बसलेल्या शिवसेनेने चचेर्चे दरवाजेच बंद केल्याने सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपच जात्यात आला आहे. त्यातच युतीचे सरकार स्थापन झाले तरी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, अर्थ अशी महत्त्वाची खाती शिवसेनेला द्यावी लागणार असल्याने भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कमी जागा देऊन भाजपची सरशी झाली होती. परंतु युद्धात जिंकलेल्या भाजपच्या नेत्यांवर तहात हरण्याची वेळ आली आहे. भाजपने सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला आपल्या अटींवर सरकारमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही महत्त्वाची खाती सेनेला दिली नव्हती. मात्र आता १०० पेक्षा अधिक जागा जिंकूनही भाजपला शिवसेना आपल्या तालावर नाचवत आहे, अशी भाजप नेत्यांची भावना झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काय शब्द दिला, हे राज्यातील कुणाही नेत्याला माहीत नाही, असे भाजपच्या गोटात बोलले जात आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिले नाही, तरी इतर काही महत्त्वाची खाती मात्र भाजपला सोडावीच लागणार आहेत. नगरविकास आणि गृह हे विभाग मुख्यमंत्र्यांकडे राहतील. महसल, अर्थ, सार्वजनिक बांधकाम आदी खाती शिवसेनेकडे गेली, तर भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांना कमी दर्जाच्या खात्यांवर समाधान मानावे लागेल, असा सूर भाजपमध्ये निघत आहे. तसेच, मंत्रिमंडळावर शिवसेनेचा वरचष्मा राहण्याची सल भाजपला बोचत आहे. सरकार स्थापन करण्याआधी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस हे पल एकत्र आले असन. ते आगामी काळात भाजपसाठी त्रासदायक होणार आहेत. त्यामुळे भाजपला माघार घ्यावी लागेल, तसेच विधिमंडळातही भाजपला आपली रणनीती बदलावी लागेल, असे भाजपच्या नेत्यांचे मत आहे.
सरकार स्थापनेची चर्चा रखडल्याने भाजपमध्ये अस्वस्थता