एलआयसी'ची ग्राहकांना भेट; बंद पॉलिसी चालू होणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था, देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी 'लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन' म्हणजेच 'एलआयसी'च्या ग्राहकांसाठी चांगलं वृत्त आहे. एलआयसीने दोन वर्षापासून पॉलिसी बंद असणाऱ्या ग्राहकांना ती पुन्हा चालू करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच ज्या ग्राहकांच्या पॉलिसीचे नूतनीकरण रखडले आहे त्यांना ती पुन्हा चालू करता येणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीत हप्ता न भरलेल्या विमाधारकांना विमा योजनेचे (पॉलिसी) पुनरुज्जीवन करण्याची अनुमती दिली आहे. यामुळे महामंडळाने विकलेल्या एकूण योजनेचा विमा हप्ता भरणे सुरू असलेल्या योजनेच्या गुणोत्तरात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत हप्ता थकल्यास योजनेचे नूतनीकरण शक्य नव्हते. सुधारित आदेशामुळे आता दोन वर्षांहून अधिक काळासाठी हप्ता थकनही योजनेचे नतनीकरण शक्य होणार आहे. असे महामंडळाच्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार कणीही पॉलिसीधारक सलग दोन वर्षे प्रीमियम भरत नसेल तर, त्याची पॉलिसी बंद करण्यात येते. एकदा बंद झालेल्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. तीन दिवसांचा वीकेंड कर्मचारी आणि